मुंबई : मुंबईत पतीने पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. बायको जवळ घेत नसल्याचा राग अनावर झाल्याने ५८ वर्षीय व्यक्तीने ४८ वर्षीय पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, ज्ञानोबा बलाडे हा मालवणीच्या यशोदिप को आॅप सोसायटी, अंदा काॅलनी गेट नं ८ येथे राहण्यास आहे. सदर ठिकाणी त्याच्या पत्नीसोबत राहतो. शुक्रवारी रात्री ज्ञानोबा बलाडे हा पत्नीच्या शेजारी झोपायला गेला. मात्र, पत्नीने त्यास जवळ झोपू दिले नाही. या गोष्टीचा राग अनावर झाल्याने ज्ञानोबा बलाडे याने दगडाचा पाटा पत्नीच्या डोक्यात घालून तिची हत्या केली.
दरम्यान,. पोलिसांना घटनेची माहिती कळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी ज्ञानोबा बलाडे याला पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक केली.