Type Here to Get Search Results !

'किमान समान कार्यकमामध्ये औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा नव्हता’: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!


औरंगाबाद : 'किमान समान कार्यकमामध्ये औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा नव्हता. संभाजीनगर नामकरणाचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर आम्हाला कळले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज संभाजीनगर नामांतराच्या मुद्द्यावर वक्तव्य केले.



तसेच, ते पुढे म्हणाले, नामांतराचा निर्णय घेतला तो आमच्या किमान समान कार्यक्रमामधील नव्हता, शेवटच्या मंत्रीमंडळात हा निर्णय घेतला, मात्र, याबाबत आमच्याशी संवाद नव्हता हा निर्णय घेतल्यावर आम्हाला कळाले. तसेच मंत्रीमंडळाच्या कामाची पद्धत असते. मुख्यमंत्र्य़ाचा निर्णय अंतिम असतो. तिथे मते व्यक्त केली जातात. मात्र, निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो. त्याचप्रमाणे, त्यावेळी या निर्णयाविरोधात मते व्यक्त केली गेली होती. असही पवारांनी  स्पष्ट केले.



दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी संभाजीनगर नामांतराच्या मुद्द्यावर वक्तव्य केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies