मुंबई : सध्या एकनाथ शिंदे आणि शिवसेना असा नवा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यात संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सतत टीका केली जात आहे. त्यानंतर आता 'संजय राऊत दिशाभूल करणारी वक्तव्ये करत असतात, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी राऊतांवर केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'आपण ज्या घडामोडी पाहत आहोत त्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. बाळासाहेब यांच्या विचारावर हे सरकार चालत आहे. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, संघटना आणि सामान्य माणसांनी आम्ही घेतलेल्या निर्णय आणि सरकारला पाठिंबा दिला आहे. सामान्य माणसाला न्याय देण्याची आमची भूमिका आहे', असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
'जो दावा केला आहे, तो खरा ठरेलं. राष्ट्रपतिपदावरील उमेदवार या आदिवासी समाजातील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो निर्णय घेतला आहे. त्याचे सर्वांनी समर्थन केल आहे. त्यांना रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल आणि द्रौपदी निवडणूक जिंकतील', असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.