औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी परिसरातील जयभवानी नगरमध्ये शनिवारी (16 जुलै) रात्री ही NEET परीक्षा एका दिवसावर आली असताना एका विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केली. ऋतुजा गणेश शिंदे (वय 18) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि , ऋतुजा शिंदे ही विद्यार्थीनी NEET परीक्षेचा अभ्यास करत होती. ऋतुजाला बारावी परीक्षेत चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे तिने NEET परीक्षेची तयारी सुरू केली होती. मात्र पहिल्या परीक्षेत तिला कमी गुण मिळाले. त्यामुळे ऋतुजाने पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षेची तयारी केली.
दरम्यान परीक्षा एका दिवसावर आली असताना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ऋतुजाने गळफास घेत आत्महत्या केली. ऋतुजाच्या आताम्हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, परीक्षेच्या तणावातून तिने आत्महत्या केली असल्याचा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.