मुंबई : प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलाने योग्य मार्गावर जावे आणि आयुष्यात कधीही चुकीचे काम करू नये. पण अनेक वेळा जाणूनबुजून किंवा नकळत पालक आपल्या मुलांना अशा अनेक गोष्टी सांगतात त्यामुळे त्यांच्या मनावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत मुलाशी बोलतांना आपण काय बोलत आहोत आणि त्याचे परिणाम काय आहेत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
१. बरेच वेळा आपण रागात आल्यानंतर आपण आपल्या जोडीदाराविषयी किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीविषयी असणारा राग हा आपल्या मुलांसमोर व्यक्त करतो त्यामुळे मुल देखील त्यांच्याशी तसेच वागू व बोलू लागतात. त्यामुळे मुलांशी बोलताना किंवा वागताना काळजी घ्यायला हवी.
२. मुलांशी बोलताना नेहमी पैसा किंवा आजाराबद्दल बोलू नका. आई-वडील जेव्हा पैसे किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊन मुलासमोर बोलतात तेव्हा त्यांच्या वागण्यात फरक जाणवू लागतो. त्यांना त्या गोष्टींची अधिक भिती वाटू लागते.
३. आपल्या मुलांची तुलना इतर कोणत्याही व्यक्तीशी करु नये. त्यामुळे मुलांची चिडचिड होऊ लागते. तसेच ते स्वत:ला कमकुवत समजू लागतात यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ लागतो.
४. मुलांवर रागवताना त्यांना अपशब्द बोलू नका. त्याचा त्यांच्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे मुले आपल्यापासून दुरावू शकतात. तसेच ते सतत दुखी होऊन त्याच्या बालमनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.