मुंबई: मालाडमध्ये बुधवारी मध्यरात्री प्रेयसीचे दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचे कळल्यानंतर संतापलेल्या प्रियकराने तिची गळा चिरुन हत्या केली. मनीषा पृथ्वीपाल जयस्वाल (27) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अखिलेश कुमार प्यारेलाल गौतम (24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, अखिलेश आणि मनिषाचे प्रेमसंबंध होते आणि दोघे लग्नही करणार होते. परंतु, मृत मनीषाचे तिच्या मावसभावाशी संबंध असल्याची माहिती अखिलेशला मिळाली होती. त्यामुळे तो चिडला होता. अखिलेश आणि मृत तरुणी आसपासच्या गावात राहायचे. प्रेयसी घरी एकटी असताना अखिलेशने तिचा गळा चिरून डोक्यावर वार करत तिची हत्या केली.
दरम्यान, मध्यरात्री मनिषाचा मावस भाऊ घरी आल्यानंतर हत्येची घटना समोर आली. कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून मानखुर्द रेल्वे स्थानकावर सापळा रचून आरोपीला अटक केली.