Type Here to Get Search Results !

‘यांची’ मुख्यमंत्री होऊनही भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय': उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल!



मुंबई: मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या  बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असल्याचे बोलले जात आहे.  या फुटीमुळे राज्यात शिंदे आणि ठाकरे असे दोन गट शिवसेनेमध्ये निर्माण झाले. याच पार्श्वभूमिवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रासाठी एक मुलाखत दिली असून या मुलाखतीत त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात शाब्दिक वारही केले आहेत.


तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, "चूक माझी आहे. गुन्हा माझा आहे. तो म्हणजे मी यांना परिवारातले समजून त्यांच्या अंधविश्वास ठेवला. समजा मी यांना मुख्यमंत्री केलं असतं तर यांनी काय वेगळं केलं असतं? त्यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय. स्वतःची तुलना शिवसेना प्रमुखांशी करत आहेत, असा आरोप करत सध्या सुरु आहे ती राक्षसी महत्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात." अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक वार केले.


दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीदरम्यान मोठ्या प्रमाणात शिंदे गटावर व विरीधकांवर शाब्दिक वार केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies