Type Here to Get Search Results !

...तर मी जगाचा निरोप घेऊन निघून जाईन': मुख्यमंत्री एकनाथ शिंदे!


मुंबई : अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी पार पडली. या चाचणीत सरकारने आपले बहुमत सिद्ध केले. दरम्यान, बहुमत चाचणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत भाषण केले.



यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वत:चे मंत्रीपद दावावर लावून मी 50 आमदारांना घेऊन, समोर बसलेल्या बलाढ्य सरकारविरोधात बंड पुकारले. समोर सत्ता, यंत्रणा, एवढी मोठी माणसे होती. दुसरीकडे बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक. मला अभिमान आहे या ५० लोकांचा. आपण हे मिशन सुरु केले तेव्हा कोणी विचारले नाही. कुठे चाललोय, कधी चाललोय, किती वेळ लागणार कोणी विचारले नाही.”



तसेच, पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'एका बाजुला महान नेते होते, सरकार होते, यंत्रणा होती आणि दुसरीकडे माझ्यासारखा एक साधा शिवसैनिक होता. पण माझ्या भरोशावर चाळीस आमदारांनी सगळं पणाला लावलं. या सगळ्यांचा मला अभिमान आहे. मी या सगळ्यांना सांगितलंय की पुढं काय व्हायचं ते होवो, तुमचं नुकसान होतंय असं वाटलं तर मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही. तर मी जगाचा निरोप घेऊन निघून जाईन', असे एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies