मुंबई : बंडखोर आमदारांनी पहिल्या दिवशी आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेतून बाहेर पडल्याचं सांगितलं नंतर राष्ट्रवादी निधी देत नाही, असं सांगितलं. त्यामुळे बंडखोरांनी बाहेर का पडलो? याचं एक कारण ठरवावं हवतर यासाठी बंडखोर आमदारांनी एक कार्यशाळा घ्यावी असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला आहे. ते आज माध्यामांशी बोलत होते.
यावेळी बोलताना राऊत यांनी त्यांची आणि शरद पवारांची भेट झाल्याचं सांगितलं, राऊत म्हणाले, 'शरद पवार साहेबांसोबत राजकीय चर्चा झाली, वर्तमान भविष्य आणि भूतकाळ विषयी चर्चा झाली. महाविकास आघाडीतले सगळे नेते आम्ही लवकरच भेटणार आहोत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली अशा चर्चा यापुढे सुद्धा होत राहतील असं राऊत म्हणाले.
तसचं व्हीप बदलणे हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. लोकसभेमध्ये चीफ व्हीपचं महत्त्व खूप असतं असं राऊतांनी सांगितलं. यावेळी त्यांना बंडखोर आमदारांवरती चांगलाच निशाणा साधला. हवंतर त्यांनी यासाठी एखादी कार्यशाळा घ्यावी, असा खोचक टोला त्यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला. आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाहेर पडल्याचं त्यांनी आधी सांगितलं नंतर राष्ट्रवादी निधी देत नाही असं सांगितलं त्यामुळे नेमकं एक कारण ठरवा असही राऊत म्हणाले.