Type Here to Get Search Results !

“वेळ पडल्यास लोकहितासाठी कायदा बदलण्याचे काम हे सरकार करेल”



नंदुरबार: वेळ पडली तर लोकहितासाठी कायदा बदलण्याचे काम हे सरकार करेल, तुमचाच भाऊ मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर बसला असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.



यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आतापर्यंत काही लोकांना वाटत होते की आम्हीच सर्वोच्च पदावर बसू शकतो. पण, सर्वसामान्य व्यक्ती आता या पदावर आहे. नंदुरबारमधील नगरपालिकांना मी डबल, टिबल, चोबल निधी तुम्हाला देतो. तुमच्या रखडलेल्या सगळ्या योजना सुरू होतील, येणाऱ्या अडीज वर्षात हे सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी हे युतीच सरकार असेल तुम्ही चिंता करू नका. आम्ही तुम्हाला वर ठेवू वेळ पडली तर लोकहितासाठी कायदा बदलण्याचे काम हे सरकार करेल, तुमचाच भाऊ या मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर बसलाय. तुम्हाला न्याय मिळेल शेतकऱ्यांना ५० हजाराच कर्जमाफी केली, इंधनाचे दर कमी केलेत. एक एक टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ नंदुरबारला काही कमी पडणार नाही. चंद्रकांत रघुवंशी यांच्यमागे मी देखील उभा असल्याचे देखील वक्तव्य यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.



दरम्यान, आज नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. जिल्ह्यातील त्यांचे राजकीय समर्थक, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी आदी २ हजार कार्यकर्त्यांसह होणार प्रवेश करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies