मुंबई: शिवसेनेने व्हिपच्या विरोधात काम केल्याल्या आंमदारांवर कारवाई व्हावी अशा मागण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. शिवसेनेच्या याचिकांवर आज सुनावणी झाली. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला तर शिंदे गटाच्या वतीने वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाकडून वेळ वाढवून मागण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने पुढची सुनावणी १ ऑगस्टला होणार असल्याचे सांगितले आहे, या पार्श्वभूमिवर काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी ट्विट करुन टीका केली आहे.
अतुल लोंढे ट्विट करत म्हणाले, 'माननीय सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे सांगितलेले आहे, त्यामुळे आता दोनच लोकांचे मंत्रिमंडळ राहणार मंत्रिमंडळ विस्तार करता येणार नाही, असे ट्विट अतुल लोंढे यांनी केले.
दरम्यान, आता कोर्टाच्या या निर्णयामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलला जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.