पंढरपूर: जवळपास ४० आमदारांपाठोपाठ ठाणे, नवी मुंबईमधील नगरसेवकांनी शिवसेनेचे बंध तोडून ते शिंदे गटात सामील झाले आहेत.तसेच, सेनेचे अनेक खासदार देखील आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. अशातच आता, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदीरात महापूजेसाठी आले असता त्यांची आणि शिवसेना खासदार संजय जाधव यांची भेट झाली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले.
याच पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव म्हणाले 'माझ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये, मागिल अनेक वर्षांपासून मी महापूजेसाठी येत असतो. तसाच आज आलो. मुख्यमंत्री माझे जुने मित्र आहेत त्यामुळे त्यांची भेट घेतली. याचा वेगळा अर्थ काढू नये' असे वक्तव्य जाधव यांनी केले.
तसेच, ज्या शिवसेनेने अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाला खासदार पदापर्यंतं नेले. ती शिवसेना कधी सोडणार नाही, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्याचा आनंद आम्हाला पण झाला. सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर बसला याचा आम्हाला अभिमानाचं आहे. मात्र, शिंदे यांनी झाले गेले विसरून त्यांनी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या आमदारांनी परत शिवसेनेत यावे असे आवाहन खासदार संजय जाधव यांनी केले.