Type Here to Get Search Results !

१७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका ‘या’ तारखेला पडणार पार!



मुंबई : राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. आयोगाने जाहीर केलेल्या तारखेनुसार ही निवडणुक प्रक्रिया १८ ऑगस्टला पार पडणार आहे.



आता १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिका ४ नगरपंचायती सार्वत्रिक सदस्यपदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २० तारखेला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून २२ ते २८ जुलै दरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करायचे आहेत. या नामनिर्देशनपत्रांची छाननी २९ जुलैला होणार आहे.



दरम्यान, उमेदवारांना आपले अर्ज माघार घेण्याची मुदत ४ ऑगस्टपर्यंत आहे. तसेच या निवडणुकांचे निकाल १८ आणि १९ तारखेला जाहीर करण्यात येणार असल्याचे  आयोगाने सांगितले आहे.



तसेच,  पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार  आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies