Type Here to Get Search Results !

“...तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या”: उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट!



मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या  बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असल्याचे बोलले जात आहे.  या फुटीमुळे राज्यात शिंदे आणि ठाकरे असे दोन गट शिवसेनेमध्ये निर्माण झाले. याच पार्श्वभूमिवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रासाठी एक मुलाखत दिली असून या मुलाखतीत त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात शाब्दिक वारही केले आहेत.


मुलाखतीत शस्त्रक्रियेविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "काहीजण मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. आता तेच लोक पक्ष बुडवायला निघाले आहेत. मी उभा राहू शकत नव्हतो, याचा काहींना आनंद झाला होता. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या, तसेच,  शिवसेनेकडे आम्ही पक्ष नव्हे परिवार म्हणून पाहिले. ज्यांना पक्ष संभाळायला दिला त्यांनीच विश्वासघात केला, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला.



दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे कधीही बाहेर पडले नाहीत असा आरोप त्यांच्यावर सतत  झाला. या पार्श्वभूमीवर बोलताना  उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies