सांगली: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानूसार आजही (गुरुवार) सातारा, सांगली, रत्नागिरी तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. काही ठिकाणी छाेटे-माेठे पुल पाण्याखाली गेले आहेत.
तसेच, सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ सुरू आहे. गेल्या आठ दिवसांत फुटा फुटाने पाणी पातळीत वाढ होत आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने कोयनेतून एक हजार 50 क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याने सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत रात्रीत दीड फुटाने वाढ झाली आहे. कृष्णेची पातळी साडे एकोणीस फुटांवर गेली आहे. तर अलमट्टी धरणातून एक लाख 25 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्याला यंदा तरी थोडा दिलासा मिळाला आहे.