मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बंडानंतर पहिल्यांदाच जाहीर मुलाखत दिली आहे. ही मुलाखत दै. सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली.
या मुलाखतीत उध्दव ठाकरे म्हणाले, “बंडखोर आमदारांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न घेता निवडणूक लढवून दाखवावी. बंडखोर आमदारांनी आपल्या भाषणात आपल्या आई-वडिलांचे नाव घेऊन निवडणूक लढवावी. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न वापरता निवडणूक लढवून दाखवावी.
दरम्यान, या मुलाखतीत बंडखोर आमदारांसह विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.