मुंबई - कोश्यारींना घरी पाठवायचं की तुरुंगात हे ठरवावं लागेल. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम त्यांनी केलंय. राज्यपाल म्हणून महाराष्ट्राचं मीठ गेली तीन वर्षं खाताय, त्या मिठाशी त्यांनी नमक हरामी केलीय. जे नवहिंदुत्ववादी आहेत. कडवे हिंदू असतील, मोडधारी सत्ताधारी हिंदूंना, ज्यांच्या मते आम्ही हिंदुत्व सोडलंय. राज्यपालांबद्दल सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे. हे पार्सल राज्यपालपदाचा आदर राखत नसेल. मराठीचा अपमान करत असेल, तर त्यांना घरी पाठवायचं की तुरुंगात याचा निर्णय घ्यावा लागेल, असे वक्तव्य करत उद्धव ठाकरेनी राज्यपालांवर जोरदार टीका केली.
तसेच ते पुढे म्हणाले, ज्यपालांनी महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान केला आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती, परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक गोष्टी त्यात आहेत. त्यांना कोल्हापूरचं वहाण त्यांना दाखवायची गरज आहे. ते महाराष्ट्राचं वैभव आहे. त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात साधी माणसं काय कष्टानं वर येतात हे सांगण्यासाठी मी त्याचा वापर केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे अनावधानानं आलेलं विधान नाही. काही ठिकाणी राज्यपाल तत्परतेनं हलताना दिसतात, काही ठिकाणी ते अजगरासारखे सुस्त बसलेले दिसतात , असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.