Type Here to Get Search Results !

“राज्यपालांना घरी पाठवायचं की तुरुंगात...” राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची टीका!



मुंबई - कोश्यारींना घरी पाठवायचं की तुरुंगात हे ठरवावं लागेल. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम त्यांनी केलंय. राज्यपाल म्हणून महाराष्ट्राचं मीठ गेली तीन वर्षं खाताय, त्या मिठाशी त्यांनी नमक हरामी केलीय. जे नवहिंदुत्ववादी आहेत. कडवे हिंदू असतील, मोडधारी सत्ताधारी हिंदूंना, ज्यांच्या मते आम्ही हिंदुत्व सोडलंय.  राज्यपालांबद्दल सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे. हे पार्सल राज्यपालपदाचा आदर राखत नसेल. मराठीचा अपमान करत असेल, तर त्यांना घरी पाठवायचं की तुरुंगात याचा निर्णय घ्यावा लागेल, असे वक्तव्य करत उद्धव ठाकरेनी राज्यपालांवर जोरदार टीका केली.



तसेच ते पुढे म्हणाले, ज्यपालांनी महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान केला आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती, परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक गोष्टी त्यात आहेत. त्यांना कोल्हापूरचं वहाण त्यांना दाखवायची गरज आहे. ते महाराष्ट्राचं वैभव आहे. त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात साधी माणसं काय कष्टानं वर येतात हे सांगण्यासाठी मी त्याचा वापर केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे अनावधानानं आलेलं विधान नाही. काही ठिकाणी राज्यपाल तत्परतेनं हलताना दिसतात, काही ठिकाणी ते अजगरासारखे सुस्त बसलेले दिसतात , असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.  

दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या एका विधानामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies