मुंबई: हवामान विभागाने पुढच्या 5 दिवसांसाठी देशातील विविध राज्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासोबतच हवामान खात्याने नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पुढील 48 तासांत अधिक तीव्र होणार असल्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांसोबतच मुंबईसाठीही 8, 9 आणि 10 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे.