दिल्ली - काँग्रेस देशभरात महागाई आणि बेरोजगारीविरोधात रस्त्यावर उतरली आहे. काँग्रेस राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या दिल्लीतील निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे.अशातच राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधी म्हणाले, “देशात लोकशाहीची हत्या सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे. आज देशात चार लोकांची हुकूमशाही सुरु केली आहे, 'आम्हाला महागाई, बेरोजगारीचा मुद्दा मांडायचा आहे. आम्हाला याबद्दल चर्चा करायची आहे. आम्हाला बोलू दिले जात नाही. संसदेत चर्चा होत नाही. आम्हाला अटक केली जाते. ही आज भारताची स्थिती आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
तसेच, काँग्रेसनं जे 70 वर्षात कमावलं ते भाजपनं 7 वर्षात गमावलं आहे, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.