आटपाडी: आज ९ ऑगस्ट. भारताच्या इतिहासात 9 ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
1890 : गायक आणि नट केशवराव भोसले यांचा जन्म
1975 : भारतीय अभिनेते आणि निर्माते महेश बाबू यांचा जन्म
1991 : अभिनेत्री आणि मॉडेल हंसिका मोटवानीचा जन्म
1909 : कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्म याचे गाढे अभ्यासक डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचा जन्म
1776 : ऍव्होगॅड्रो - इटालियन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म
1754 : पिअर चार्ल्स एल्फांट - वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च-अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंते यांचा जन्म
2015 : भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी कायर किन्हाण्णा राय यांचे निधन
2002 : सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांचे निधन
1996 : जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट यांचे निधन
1976 : ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचे निधन
1948 : हुगो बॉस कंपनीचे संस्थापक हुगो बॉस यांचे निधन
1901 : मराठी रंगभुमीचे जनक विष्णूदास अमृत भावे यांचे निधन
1965 : मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
1945 : अमेरिकेने दुसरा अणुबाँब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला.
1925 : चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.
1892 : थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.
1173 : पिसाच्या झुलत्या मनोऱ्याचे बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास दोनशे वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.