वर्धा: वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील महामार्गावरील पेट्रोलपंप नजीकच्या वळणावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर बाळकृष्ण राऊत (वय 40) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, ज्ञानेश्वर हे त्यांच्या कवठा रेल्वे येथील घरून कामावर जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. पुलगाव जवळील महामार्गवरील वळणावर त्यांची दुचाकी अनियंत्रित झाल्याने ते दुचाकीसह रस्त्याच्या कडेला पडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, चालकास वळणावर दुचाकी अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला आहे.