सांगली : सांगली जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. येथील कृष्णा नदीची पाणी पातळी सत्तावीस फुटांवर पोहचली आहे. याबराेबरच अलमट्टी धरणातून दोन लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने सांगलीस दिलासा मिळाला आहे. दरम्यान पावसामुळं जिल्ह्यातील एक पूल आणि तेरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
माहितीनुसार, सांगलीत आयर्विन पुलाच्या जवळ कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने नदी काठावरील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच, सततचा पडणार पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळी वाढली आहे. या नदीची पाणी पातळी सत्तावीस फुटांवर जाऊन पोहचली आहे.