Type Here to Get Search Results !

बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेत त्यांनी कुणाशी युती करावी..; ‘यांचा’ ठाकरेंना टोला



मुंबई - बाळासाहेबांच्या विचारांचे पालन करणे आमच्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कटिबद्ध आहेत. बाळासाहेब हिंदुत्वापासून कधीही लांब गेले नसते. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली नसती. हेच राज्यात घडलं. त्यालाच बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जाणे म्हणतात. आम्ही हिंदुत्व आणि बाळासाहेब यांच्या विचारांशी दूर गेलो नाही असे  दीपक केसरकर त्यांनी म्हटले. 



तसेच,  एकनाथ शिंदे यांच्यासह आम्ही सर्व सहकारी बाळासाहेबांची विचारधारा पुढे घेऊन चाललो आहोत. दसरा मेळावा आणि बाळासाहेब हे वेगळं करता येत नाही. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाच्या भूमिकेपासून आम्ही फारकत घेतली नाही. दसरा मेळावा ही बाळासाहेबांनी सुरु केलेली परंपरा आहे. वाद निर्माण करण्याचा कुठलाही उद्देश नाही. जे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी दूर गेलेत त्यांनी काय करावं? कुणाशी युती करावी न करावी हा विचार त्यांनी करावा असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies