लातूर :बहिणीकडून चहा घेऊन घराबाहेर पडलेल्या एका तरुणाने लातुरातील बार्शी रोडवरील रेल्वे उड्डाण पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील आनंद शिवाजीराव क्षीरसागर (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मयत आनंद याच्या दोन्ही बहिणी लातूरतील श्रीनगर भागात वास्तव्याला आहेत. दरम्यान, तो बहिणीकडे आला होता. मेडिकलवरून गोळी आणतो म्हणून घराबाहेर पडला. त्यानंतर बार्शी रोडवर असलेल्या रेल्वे उड्डाण पुलावरून उडी मारुन आत्महत्या केली.
दरम्यान, तास- दीड तास झाले भाऊ आला नाही; म्हणून बहिणीने भावाच्या मोबाइलवर फोन केला. घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीने मोबाईल उचलून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.