Type Here to Get Search Results !

“आमच्या शिवाय मंत्रिमंडळ पूर्ण होणार नाही”: ‘या’ आमदाराची मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठी प्रतिक्रिया!



मुंबई: आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 



यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे. आमच्या शिवाय मंत्रिमंडळ पूर्ण होणार नाही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुढील मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, मी नाराज आहे म्हणून मंत्रिमंडळाच्या शपत विधीला उपस्थित नव्हतो असे नाही, असे वक्तव्य प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केले.



तसेच  ते पुढे म्हणाले, ज्या मंत्र्यांनी आज बाळासाहेबांचे नाव जरी घेतले नसले तरी त्यांचे विचार हे त्यांच्या मनात आहेत. काही कामानिमित्त मी विधीमंडळात आलो. पण प्रहारची वाटचाल भविष्यात मोठी असेल. अशीही मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies