बारामती: भोरमधील पिराचा मळा परिसरातल्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत दहा जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत गोठा पूर्णपणे जळाल्यानं शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुधीर चंद्रकांत तारू असे जळालेल्या गोठ्याच्या मालकाचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अहि कि, शेतकरी सुधीर चंद्रकांत तारू यांनी रात्री जनावरांना चारा टाकून, धारा काढून झाल्यानंतर ही आग लागली. या आगीत ५ म्हशी, २ बैल, २ शेळ्या आणि एक रेडकू यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शिवाय आगीत जनावरांसह संपूर्ण गोठा जळून खाक झाला आहे.या आगीत शेतकऱ्याचे जवळपास नऊ ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, स्थानिक शेतकरी आणि अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.तसेच, सदर गोठ्याला कशामुळे आग लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.