नवी दिल्ली - भाजपासोबत सरकार कोसळल्यानंतर नितीश कुमारांनी आरजेडीला सोबत घेत सरकार स्थापन केले. दिल्लीत उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर झालेल्या सीबीआय कारवाईनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
तसेच, मी लवकरच ऑपरेशन लोटसवर खुलासा करणार असल्याचे दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली. आमदारांना विकत घेण्यासाठी त्यांनी ८०० कोटी ठेवले आहेत. सीबीआय आणि ईडीकडून आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत. देशात महागाई वाढवून भाजपा आमदारांची खरेदी करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
दरम्यान, प्रत्येक आमदाराला २० कोटींची ऑफर आली आहे असा दावा आपने केला आहे.