Type Here to Get Search Results !

“शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची आता त्यांना गरज नाही”: ‘या’ नेत्याची मुख्यमंत्र्यावर टीका!



मुंबई: आज शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. सकाळी शिंदे गटातील ९ तर भाजमधील ९ आमदारांनी शपथ घेतली. यावरुन आता शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.



शिंदे सरकार म्हणजे गरज सरो वैद्य मरो असे आहे, शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची आता त्यांना गरज उरली नाही. जे गेलेत त्यांना आता संभाळायची कसरत सध्या मुख्यमंत्री करतील, ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. आणि  महत्वाचे म्हणजे ज्या बाळासाहेबांचे नाव घेऊन हे बाहेर पडले त्यांचाही आज विसर पडला आहे. पण आनंद आहे की गद्दारांच्या तोंडात त्यांचे नाव नव्हते,  अशी टीका आमदार अंबादास दानवे यांनी केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies