बांदा : उत्तरप्रदेशातील बांदा येथे रक्षबंधनासाठी निघालेल्या प्रवाशांची बोट यमुना नदीत उलटली. या बोटीतून जवळपास ३० हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, सुमारे ३० ते ३५ जणांना घेऊन ही बोट फतेहपूर जिल्ह्यातील जरौली घाटाकडे जात होती. नदीत मध्यभागी पोहोचताच जोरदार वाऱ्याने बोट उलटली. आतापर्यंत चार जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले आहेत. त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, बोट बुडाल्याची माहिती मिळताच प्रशासनासह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बोट बुडताच सुमारे आठ जण पोहत बाहेर आले. पोलिसांनी आतापर्यंत २ लहान मुलांसह एका महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. अजूनही जवळास २० प्रवासी बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.