रत्नागिरी: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले. आज खातेवाटप झाल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे उद्योग खात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, 'उद्योग खात्यासारखं महत्वपुर्ण खातं मला दिल्याबद्दल सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनापासून धन्यवाद देतो. राज्यातील बेराजगारी मोठा प्रश्न असून जास्तीत जास्त प्रकल्प राज्यात आणुन ती दूर करण्याचा प्रयत्न करणार. तसेच महाराष्ट्र उद्योगिक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणणार असून कोकणातील रिफायनरीबाबत असणारे गैरसमज दूर करायला हवेत, असे वक्तव्य उदय सामंत यांनी केले.
दरम्यान, बोलताना सामंत म्हणाले, 'महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात क्रमांक एकवर आणणार असल्याचा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.