Type Here to Get Search Results !

" भाजपमध्ये जागा आणि मान मिळावा म्हणून त्यांना हे सरकार लवकर पाडण्यास सांगा"



बिहार: “ महाआघाडीचे सरकार पाडण्यासाठी सुशील मोदींशी बोला. सुशील मोदी आमचे सरकार पडेल असे म्हणत असतील तर त्यांना भाजपमध्ये जागा आणि मान मिळावा म्हणून त्यांना हे सरकार लवकर पाडण्यास सांगा. २०२० मध्ये बिहारमध्ये सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांच्याकडून काहीही काम झाले नाही. त्याचा मला खूप त्रास झाला. सुशील मोदींनी आता रोजच बोलत राहायला पाहिजे कारण या निमित्ताने केंद्रातील नेतेमंडळी त्यांच्यावर खूश झाली तर मला खूप आनंद होईल आणि त्यांना पक्षात कदाचित काही तरी पद मिळेल.” 



दरम्यान, बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सुशील मोदी म्हणाले होते की, बिहारचे महागठबंधन सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही आणि लवकरच पडेल. कारण नितीश कुमार यांना IRCTC घोटाळ्याची लवकरात लवकर चौकशी करायची आहे. जेणेकरुन तेजस्वी यादव तुरुंगात जातील आणि राजद पक्ष फोडता येईल.यावर प्रत्युत्तर देताना नितीश कुमार यांनी वरील वक्तव्य केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies