मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू असतानाच, आता शिंदे-फडणवीस सरकारच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी माहिती समोर आली आहे. कारण, सरकारस्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबतच्या ठरावाची कागदपत्रचं राज्यपाल सचिवालयाकडे नाही, अशी माहिती समोर आली आहे. एका माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी शिंदे सरकारच्या पाठिंब्याची माहिती राज्यपाल भवनाकडे मागितली होती. पण राज्यपालांच्या सचिवालयाकडे तशी कागदपत्रचं उपलब्ध नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारस्थापनेच्या कागदपत्राची माहितीच उपलब्ध नसल्याने सरकारच्या वैधतेवर सवाल निर्माण झाला आहे.