औरंगाबाद: विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरुन आता महाविकास आघाडीमध्ये फुट पडल्याचे दिसत आहे. महाविकासआघाडी ही काही नैसर्गिक आघाडी नाही तर तो केवळ विपरीत परिस्थितीमध्ये घेतलेला निर्णय असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
पटोले म्हणाले, विधानसभेत राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता झाला, विधान परिषद नेता आम्हाला हवा होता बसून निर्णय घेता आला असता, मात्र आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि नेता निवडला. हे आम्हाला साधं विचारायला तयार नाहीत. आमच्याशी बोलायला तयार नाहीत. आमची आघाडी विपरीत परिस्थीती मध्ये झाली होती आमची नैसर्गिक आघाडी नाही हे सत्य आहे. असे म्हणत पटोले यांनी महाविकास आघाडीबाबत नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, असे म्हणत नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर नाराजी व्यक्त करत आपला रोष व्यक्त केला.