Type Here to Get Search Results !

पाणी पातळीचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यु!



अकोला:  अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या मनब्दा येथील विद्रुपा नदीतील खोलीकरण केलेल्या तलावात दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला  आहे. ऋषी संतोष सुरळकार आणि सागर संतोष दांडगे अशी या मुलांची नावे आहेत. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, या दोन्ही मुलाचे आई वडील हे शेतात मजुरी करण्यासाठी गेले होते. त्यामुळे मुलावर कुणीही लक्ष द्यायला घरी कोणी नव्हते. त्यामुले दोघे मुले गावाबाहेर असलेल्या नदीवर आंघोळ करण्यासाठी गेले होते. मात्र नदीत केलेल्या खोलीकरणामुळे नदीला तलावाचे रूप आले आहे. त्यामुळे मुलाना पाणी पातळीचा अंदाज आला नाही. त्यामुळे या दोघांचा तोल जाऊन पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे.



दरम्यान, सदर घटनेची माहिती मनब्दा गावातील माजी सरपंच गोपाल राऊत,प्रदीप पाथरीकर, पोलीस पाटील व इतर सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी तातडीने तेल्हारा ठाणेदार ज्ञानोबा फड यांना माहीती दिली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies