मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला पडला परंतु, अजूनही राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
परंतु, आता ५ ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार सायंकाळी ६ वाजता राजभवन येथे होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपशविधी होणार असल्याचेही बोलले जात आहे. तसेच या मंत्री मंडळ विस्तारात शिंदे गटाचे ८ आणि भाजपचे ८ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.