नवी दिल्ली: बुद्धिबळ खेळातील मानाची स्पर्धा असणारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 यंदा भारताच्या चेन्नई शहरात खेळवली गेली. दरम्यान या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या महिला गटाने कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. यामध्ये कोनेरू हंपी, हरिका द्रोणवल्ली, तानिया सचदेव, आर वैशाली आणि भक्ती कुलकर्णी यांनी मिळून ही कामगिरी करुन दाखवली आहे.
दरम्यान, यावेळी भारतीय संघ सुरुवातीपासून सुवर्णपदकाच्या शर्यतीत चांगल्या लयीत होता. पण अंतिम फेरीत प्रवेशापूर्वीच त्यांना युएसएकडून 3-1 ने पराभव मिळवावा लागला.