Type Here to Get Search Results !

“आता उरलेला पक्ष संपवण्यासाठी ब्रिगेड जवळ केलेली दिसतेय...”!



मुंबई: “काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा करून निम्मा पक्ष गारद केला. आता उरलेला पक्ष संपवण्याठी ब्रिगेड जवळ केलेली दिसते. सगळचं संपल की मग घरी शांतपणे रोज मम्म करायचं आणि मग गाई गाई करायची,” असे ट्विट  करत  भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.



तसेच, ते पुढे म्हणाले, खोटा इतिहास सांगण्याचे, थापा मरण्याचे कौशल्य हा उद्धव ठाकरे आणि ब्रिगेड मधला समान धागा आहे, त्यामुळे ही युती नैसर्गिक असल्याचे म्हणत त्यांनी टीका केली.



दरम्यान,  एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने युती करण्याचा निर्णय घेतला असून या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे टोला लगावला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies