मुंबई : राज्यात आज 1913 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1685 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
दरम्यान, आज राज्यात पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर राज्यात एकूण 12,587 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 6087 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2298 सक्रिय रुग्ण आहेत.