मुंबई : येत्या ४ ते ५ दिवसांत मुंबई पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मुंबई, पुण्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला येलो आणि ऑरेंट अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनही सतर्क झाले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.