नवी दिल्ली : स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. देशाला पुढे नेण्यासाठी आज आपल्याला पाच शपथ घेण्याची गरज आहे. त्यांनी देशवासियांसाठी 25 वर्षांची ब्लू प्रिंट मांडली आणि सांगितले की ही ब्ल्यू प्रिंट तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा आपण या पाच शपथ घेऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशवासियांसाठी केलेले पाच संकल्प खालीलप्रमाणे:
१. विकसित भारत हा एकच संकल्प घेऊन आता भारत पुढे चालेल.
२. कोणाही भारतीयाच्या मनात गुलामीचा अंशही राहायला नको.
३. आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा. चौथा संकल्प म्हणजे एकता आणि एकजूट.
४. १३० कोटी देशवासियांच्यात एकता असयला हवी.
५. पाचवा संकल्प म्हणजे नागरिकांचं कर्तव्य. ज्यातून पंतप्रधान, मुख्यमंत्रीही सुटू शकत नाही.