ठाणे - आजही काही लोकं म्हणतात हे सरकार राहणार नाही, मात्र हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे, त्यामुळे ते टिकणारच असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.
तसेच, काही लोकांना ते हजम होत नाही, घशाखाली उतरत नाही की एकनाथ शिंदे कसा हा डोलारा सांभाळतील मात्र बाळासाहेब ठाकरे आणि या आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असून दोन महिन्यात ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे याशिवाय, सर्वसामान्य जनतेला न्याय हाच आमचा अजेंडा असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले.