नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर आता त्यांच्या समर्थक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. जम्मू-काश्मीरमधील ६४ नेत्यांनी एकाचवेळी मंगळवारी राजीनामा दिला आहे.
काँग्रेसच्या ज्या ६४ नेत्यांनी राजीनामे दिले आहेत, त्यात माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजिद वानी, घारू चौधरी, मनोहर लाल शर्मा, माजी आमदार बलवान सिंह, जम्मू काश्मीर काँग्रेसचे सचिव नरिंदर शर्मा आणि महासचिव गौरव मगोत्रा आदी नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, हे सर्व नेते येत्या रविवारी आझाद यांच्या नेतृत्वाखाली नवीन पक्षात प्रवेश करणार आहेत.