विरार : मित्राचे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्ती करायला गेलेल्या तरुणाची हत्या झाल्याची घटना विरार येथे घडली आहे. याप्रकरणी हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी अटक केली.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मोहम्मद सद्दान अन्सुरी वय ३० वर्ष हा सोमवारी दुपारी विरार पूर्वेच्या चंदनासार येथे मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. त्यावेळी त्याचा मित्र अन्वरूल याचे काही अज्ञात व्यक्तीबरोबर भांडण सुरू झाले. ते पाहून सद्दाम अन्सुरी हा भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला असता त्याच वेळी अज्ञात व्यक्तींनी सद्दाम याला मारहाण करत आणि चाकूचे वार केले. या हल्ल्यात सद्दाम जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा ३ चे पथक करत होते.