Type Here to Get Search Results !

... त्यामुळे, आदित्य ठाकरे यांच्यासह उर्वरित १५-१६ आमदारांनीच राजीनामा द्यावा: 'यांचा' हल्लाबोल!



पंढरपूर : शिवसेनेचे चाळीस आमदार एकत्रित असल्याने आमचं बहुमत आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, उलट बहुमत गमावलेल्या आदित्य ठाकरे  यांच्यासह उर्वरित १५-१६ आमदारांनीच राजीनामा देवून पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असा पलटवार शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे.



शिवसेनेच्या ४० आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानंतर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमची असल्याचे सांगण्यासाठी राज्यभरात निष्ठा यात्रा सुरु केली आहे.



निष्ठा यात्रेदरम्यान बंडखोर ४० आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत गद्दारी केल्याचा आरोप करत, त्या ४० आमदारांनी राजीनामा देवून पुन्हा निवडून येवून दाखवावं असं खुलं आव्हान आदित्य यांनी दिलं आहे. ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिउत्तर देताना आमदार शहाजी पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना आधी तु्म्ही राजीनामा देवून पु्न्हा निवडून येऊन दाखवा असे प्रतिआव्हान दिलं.



शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यामुळे दररोज सकाळी होणारी किरकिर आता बंद झाली आहे. त्यामुऴे महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण शांतपणे चालू राहिल असा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला. संजय राऊत यांचे हात स्वच्छ असते तर त्यांना अटक झाली नसती, काही तरी काळंबेरं असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांना अटक झाली असल्याचे सांगत त्यांच्या अटकेच समर्थनही त्यांनी केले.



आमचं बहुमत आहे. आम्ही राजीनामे देणार नाही. तुम्हीच पंधरा सोळा जण उरलेले आहात. आदित्य ठाकरे यांच्यासह उर्वरित आमदारांनी राजीनामे द्यावेत. तुमची आमदारकी शाबूत ठेवणार आणि आमच्या मागे लागणार का असा सवालही आमदार पाटील यांनी उध्दव व आदित्य ठाकरे यांना उद्देश यांना उद्देशून केला. कायद्याची पुस्तकं वाचा जरा असा सल्लाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाचवण्यासाठी मोठं काम केले आहे. इतिहास देखील एक दिवस हे मान्य करेल. महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. त्यांचं पटलं नसतं, तर त्यांच्या सभेला कोणी काम धंदा सोडून आले नसते. संपूर्ण महाराष्ट्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचा दावाही आमदार पाटील यांनी केला.(सौ. साम)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies