मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यभरात मुसळधार पाऊस कायम राहिल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे.