Type Here to Get Search Results !

“....मात्र आतापर्यंत लोकांना अच्छे दिन पाहायला मिळालेच नाही”; ‘यांचा’ भाजपला टोला!



ठाणे : 2014 मध्ये भाजपने जनतेला अनेक विकासकामांची आश्वासने दिली होती. अच्छे दिन येणार असे म्हणत भाजपने ही आश्वासने दिली होती. मात्र आतापर्यंत लोकांना अच्छे दिन पाहायला मिळालेच नाही. असा टोला शरद पवार यांनी भाजपला लगावला. तसेच, पवारांनी यावेळी भाजपने दिलेल्या आश्वासनाची यादी देखील वाचून दाखवली.



2022 पर्यंत प्रत्येकाजवळ हक्काचं पक्कं घर असेल, प्रत्येक घरात पाण्याचा नळ असेल, 2018 पर्यंत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत इंटरनेट सुविधा असेल, अशी आश्वासने भाजपने जनतेला दिली होती. मात्र भाजपने सांगितलेली एकही आश्वासने अजून पूर्ण केली नाही. याशिवाय,  देशातील 30 टक्के घरात अजूनही शौच्छालये नाहीत. असे म्हणत शरद पवारांनी भाजपवर टीका केली.



दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यात शरद पवार यांनी आज पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies