मुंबई: बुलेट ट्रेन हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं का? आरेची वाट लावून कारशेड उभारणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं का? मुंबईत बाळासाहेबांचं नाव चालतं मोदींचं चालत नाही. हे तुम्हाला आता कळलं आहे. असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. ते मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचा सुवर्ण महोत्सव काल पार पडला यावेळी बोलत होते.
यावेळी बोलताना ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, 'दिल्ली मिळाली आता यांचा डोळा मुंबईवर आहे. विधान भवनात एक घोषणा करण्यात आली '50 खोके एकदम ओके' हे तुम्ही सुद्धा आता बोलताय मी बोलत नाही लोकांना सर्वकाही आता ठाऊक झाला आहे.
तसेच, मुंबईत बाळासाहेबांचं नाव चालतं मोदींचं चालत नाही हे तुम्हाला आता कळाले आहे. आमदार चोरायचे खासदार चोरायचे एखाद्या पक्षाचा पक्षप्रमुख चोरायचा मग हा तुमचा पक्ष आहे की चोर बाजार आहे असा टोला लगावत यावर्षीचा दसरा मेळावा जाहीर शिवाजी पार्क मध्ये होईल असे ठाकरे यांनी वक्तव्य केले.