Type Here to Get Search Results !

“...पण नाराजी इतकीही नाही की”; बच्चू कडूंचे मोठे वक्तव्य!



मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. दरम्यान, पहिल्या टप्प्यात अपक्षांना स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे शिंदे गटाला पाठिंबा देणारे बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. व या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.



यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, 'नाराज आहे असे  नाही, थोडीफार नाराजी असतेच, पण नाराजी इतकीही नाही की, आपलं घर सोडून दुसऱ्या पक्षात निघून जाऊ. ही फक्त क्षणिक नाराजी आहे, अजून मंत्रिमंडळाचा पूर्णपणे विस्तार झालेला नाही. जर पूर्ण विस्तार झाला असता आणि संधी मिळाली नसती तर वेगळी गोष्ट असती' असेही बच्चू कडू यांनी वक्तव्य केले.



तसेच ते पुढे म्हणाले, 'मी एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त मंत्रिपदासाठी पाठिंबा दिला नव्हता. काही मुद्द्यांच्या आधारे मी पाठिंबा दिला होता', जर ते मुद्दे विचारात घेतले नाही तर वेगळा विचार करू,'  अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं, त्यामुळेच आम्ही मागणी करत आहोत, अन्यथा केलीही नसती अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies