पुणे: तिरंग्याचे महत्व दुरंग्यांना कळणार नाही, देशाचे प्रधानमंत्री तिरंग्याने घाम पुसतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
यावेळी बोलतान पटोले म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यात ज्यांचा काहीच वाटा नाही असे लोक देशात सत्तेवर आलेत, त्यांनी संविधानाच महत्त्व संपवण्याचे काम सुरू केलं आहे. भाजपा सरकार इंग्रजासारखं आणि हुकूमशहासारख वागत आहे. तसेच देशातले लोक म्हणत आहेत ते घरच नाही तर झेंडा लावू तरी कुठे? मग कसलं हर 'घर झेंडा अभियान' सगळ्यात मोठा खोटा पंतप्रधान देशाने पाहिला असल्याची टीका त्यांनी केली.
दरम्यान, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज पुण्यात पद यात्रा काढण्यात आली होती. पदयात्रेच्या समारोप प्रसंगी बोलताना पटाले यांनी भाजपसह पंतप्रधानांवर टीका केली.