मुंबई : राज्यात नवं सरकार स्थापन झालं तेव्हापासून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अनेकदा विविध मुद्द्यांवरून आमने-सामने आलेला आहे. अशातच विधानपरिषदेत शिंदे गटाला एक मोठा धक्का बसला आहे. कामकाज सल्लागार समितीत ठाकरे गटाचा समावेश करण्यात आला आहे.
विधानपरिषदेत शिंदे गट अस्तित्वातच नाही. यामुळे तिथे ठाकरे गटाचा समावेश करण्यात आला आहे. कामकाज समितीत ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि अनिल परब यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, विधानसभेत ठाकरे गटाला धक्का बसला असतानाच, आता दुसरीकडे विधानपरिषदेत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, आता कामकाज समितीत ठाकरे गटातील दोन नेत्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.